महाराष्ट्र

खोदलेल्या रस्त्यांवर झोपून नागरिकांचे आंदोलन

शहरात एकाच वेळी सगळीकडे भुयारी गटाराच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आलेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हे रस्ते खोदल्यानंतर ते रस्ते सुस्थितीत करण्याची गरज होती; मात्र काम झाल्यावर केवळ माती टाकून हे रस्ते तसेच ठेवण्यात आलेत.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगरच्या भाटिया चौकात खोदलेल्या रस्त्यावर झोपून आणि ठिय्या मांडून पालिका प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली.

शहरात एकाच वेळी सगळीकडे भुयारी गटाराच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आलेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हे रस्ते खोदल्यानंतर ते रस्ते सुस्थितीत करण्याची गरज होती; मात्र काम झाल्यावर केवळ माती टाकून हे रस्ते तसेच ठेवण्यात आलेत. त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतो आहे. विशेषत: या रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांच्या घरात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. तसेच या धुळीमुळे वृद्ध आणि लहान मुलांना श्वसनाचे विकार जडू लागलेत. शिवाय अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल