महाराष्ट्र

खोदलेल्या रस्त्यांवर झोपून नागरिकांचे आंदोलन

शहरात एकाच वेळी सगळीकडे भुयारी गटाराच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आलेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हे रस्ते खोदल्यानंतर ते रस्ते सुस्थितीत करण्याची गरज होती; मात्र काम झाल्यावर केवळ माती टाकून हे रस्ते तसेच ठेवण्यात आलेत.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगरच्या भाटिया चौकात खोदलेल्या रस्त्यावर झोपून आणि ठिय्या मांडून पालिका प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली.

शहरात एकाच वेळी सगळीकडे भुयारी गटाराच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आलेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हे रस्ते खोदल्यानंतर ते रस्ते सुस्थितीत करण्याची गरज होती; मात्र काम झाल्यावर केवळ माती टाकून हे रस्ते तसेच ठेवण्यात आलेत. त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतो आहे. विशेषत: या रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांच्या घरात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. तसेच या धुळीमुळे वृद्ध आणि लहान मुलांना श्वसनाचे विकार जडू लागलेत. शिवाय अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; गुढीपाडव्यापासून १५ डब्यांच्या लोकल वाढणार, १६ उपनगरीय सेवांचे होणार रूपांतर

Gudi Padwa 2026 : उद्या स्वागत यात्रांचा मुंबईभर जल्लोष; गिरगाव, कुर्ला, दादर येथे चित्ररथ, खेळांची पर्वणी

इंदूरमध्ये EV चार्ज करताना शॉर्ट सर्किट; सिलिंडरचा भीषण स्फोट, ७ जणांचा दुर्दैवी अंत

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन