प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

अकरावी प्रवेशाला सोमवारपर्यंत मुदतवाढ; विशेष फेरीसाठी ८०० पैकी २५० विद्यार्थ्यांनी केले अर्ज

अकरावी प्रवेशाची विशेष फेरी राबविण्याबाबत राज्यातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याने शिक्षण संचालनालयाकडून मंगळवारी रात्री अचानक विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र नवीन अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये केवळ २५० विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत.

Swapnil S

मुंबई : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी राबविण्याबाबत राज्यातील सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याने शिक्षण संचालनालयाकडून मंगळवारी रात्री अचानक विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र नवीन अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये केवळ २५० विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. त्यामुळे नवीन अर्ज व अर्जाचा दुसरा भाग भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाने १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यभरात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्या व जवळपास नऊ विशेष फेऱ्या राबविण्यात आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली.

शिक्षण संचालनालयाने ८०० विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशासाठी आलेल्या अर्जाचे कारण देत ९ डिसेंबरला रात्री अचानक विशेष फेरी जाहीर केली. हे परिपत्रक संकेतस्थळावर जाहीर करत संचालनालयाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नव्हते. त्यामुळे ही फेरी नेमकी कोणासाठी राबविण्यात येत आहे, असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित करण्यात आला होता.

Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत

यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

उकाडा, आर्द्रतेमुळे ठाणेकर हैराण; घामोळ्यांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ

Mumbai : पुनर्भरणाची व्यवस्था करा! पावसाच्या पाण्याबाबत BMC आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश