महाराष्ट्र

राज्यातून थंडी गायब; किमान तापमानात वाढ

गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ झाली असून राज्यातून थंडी गायब झाली आहे. राज्यातील अनेक भागात पहाटेचे तापमान १६ ते १८ अंशांपर्यंत पोहोचले आहे.

Swapnil S

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ झाली असून राज्यातून थंडी गायब झाली आहे. राज्यातील अनेक भागात पहाटेचे तापमान १६ ते १८ अंशांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाली आहे. तसेच किमान तापमानात वाढ होऊन तो ११ ते २० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वायू प्रदूषणाची पातळी जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या चक्राकार वारे उत्तर पाकिस्तान तसेच पश्चिम राजस्थानमध्ये आहेत. पश्चिमी चक्रवाताचा सक्रिय प्रभाव असल्यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्रामध्ये पुढचे पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय असणार आहे, असे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई