महाराष्ट्र

राज्यातून थंडी गायब; किमान तापमानात वाढ

गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ झाली असून राज्यातून थंडी गायब झाली आहे. राज्यातील अनेक भागात पहाटेचे तापमान १६ ते १८ अंशांपर्यंत पोहोचले आहे.

Swapnil S

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ झाली असून राज्यातून थंडी गायब झाली आहे. राज्यातील अनेक भागात पहाटेचे तापमान १६ ते १८ अंशांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाली आहे. तसेच किमान तापमानात वाढ होऊन तो ११ ते २० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वायू प्रदूषणाची पातळी जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या चक्राकार वारे उत्तर पाकिस्तान तसेच पश्चिम राजस्थानमध्ये आहेत. पश्चिमी चक्रवाताचा सक्रिय प्रभाव असल्यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्रामध्ये पुढचे पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय असणार आहे, असे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

मेट्रो-५च्या टेंडर, अलाइनमेंटला सुरुवात; उल्हासनगरच्या विकासाला मिळणार नवी दिशा

Mumbai : पुन्हा BEST चा अपघात! पवईत इलेक्ट्रिक बस दुभाजकावर आदळली; ७ प्रवासी जखमी, चालक म्हणाला- 'कारकडे लक्ष गेलं'

Palghar Rain Alert : पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा! डहाणू-तलासरीत पूरस्थिती, रेल्वे सेवा ठप्प

Lonavala Viral Video : ट्रेकिंगदरम्यान थोडक्यात बचावला तरुण; पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकसाठी घ्या 'ही' खबरदारी

Mumbai : "ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करेन"; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी, VIDEO व्हायरल