महाराष्ट्र

"यांनी सर्वसामान्यांचा खून सरकारी रुग्णालयात केला", राज्य सरकार निरस्त करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

नवशक्ती Web Desk

राज्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आज (५ ऑक्टोबर) रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.

यावेळी गेल्या महिनाभरता राज्यात निरपराध लोकांचे जीव औषध न मिळाल्याने गेले. त्या प्रत्येक कुटुंबाला १० लाखाची मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली. तसंच सरकार निरस्त करावं अशी देखील मागणी केल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.

हे दिवाळं निघालेलं सरकार आहे. उधळपट्टी करत आहे. जनतेचा कष्टाचा पैसा हे उधळत आहेत. भ्रष्टाचाराने माखलेले हे सरकार आहे. यांनी सर्वसामान्यांचा खून यांनी सरकारी रुग्णालयात केला आहे. आम्ही राज्यापालांना सरकारपासून संरक्षण करण्याचं सांगितलं, असं नाना पटोले म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी मलाईचा जुमला सुरु आहे असं सांगत, उच्च न्यायालयाने जे सुनावलं त्यामुळे राज्यपाल आणि न्यायालयावर आमचा विश्वास असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल