महाराष्ट्र

उमेदवारांना प्रचारासाठी गावबंदी केल्यास गुन्हे दाखल करणार - अभिजीत राऊत

Swapnil S

प्रतिनिधी/नांदेड

नांदेड लोकसभा मतदारसंघात आता २३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत तब्बल ४३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच आता प्रचाराला सुरुवात झाली असून, उमेदवारांना प्रचारासाठी गावबंदी केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी (दि. ८) पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, कॅबिनेट हॉल येथे सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पुढे बोलताना ते म्हणाले, गावबंदी केल्याप्रकरणी यापूर्वी काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रचारापासून कोणीही थांबू नये. सनदशीर मार्गाने आपला विषय मांडावा. तसेच न्यायालयाचे निर्देश आहेत.

दरम्यान, उन्हाचे प्रमाण लक्षात घेऊन मतदान केंद्रावर प्रतीक्षालयाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच तब्बल ४३ उमेदवारांनी माघार घेतील असून, त्यांनी हे कोणाच्या दबावापोटी केले का? याची विचारणा करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी स्वत:हून माघार घेत असल्याचे सांगितले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त