महाराष्ट्र

उमेदवारांना प्रचारासाठी गावबंदी केल्यास गुन्हे दाखल करणार - अभिजीत राऊत

लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, कॅबिनेट हॉल येथे सोमवारी पत्रकार परिषद घेतली.

Swapnil S

प्रतिनिधी/नांदेड

नांदेड लोकसभा मतदारसंघात आता २३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत तब्बल ४३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच आता प्रचाराला सुरुवात झाली असून, उमेदवारांना प्रचारासाठी गावबंदी केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी (दि. ८) पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, कॅबिनेट हॉल येथे सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पुढे बोलताना ते म्हणाले, गावबंदी केल्याप्रकरणी यापूर्वी काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारांना प्रचारापासून कोणीही थांबू नये. सनदशीर मार्गाने आपला विषय मांडावा. तसेच न्यायालयाचे निर्देश आहेत.

दरम्यान, उन्हाचे प्रमाण लक्षात घेऊन मतदान केंद्रावर प्रतीक्षालयाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच तब्बल ४३ उमेदवारांनी माघार घेतील असून, त्यांनी हे कोणाच्या दबावापोटी केले का? याची विचारणा करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी स्वत:हून माघार घेत असल्याचे सांगितले.

प्रशासनात फेरबदलाचे वारे! गृहनिर्माण, जलसंपदा विभागांना मिळणार नवे सचिव

मुंबई महापालिकेच्या 'त्या' विधी अधिकाऱ्यांना दिलासा; नियुक्तीच्या तारखेपासून ‘नियमित कर्मचारी’ मानण्याचा HC चा आदेश

Mumbai : वाढदिवसाच्या मेजवानीत एसी बंद; ग्राहक आयोगाचा रेस्टॉरंटला दंड

भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक व्यापार करार; भारतीय वस्तूंना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश, १५ वर्षांत २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Mumbai : बलात्कारप्रकरणी पालिका सहाय्यक आयुक्ताला अटक; लग्न झाल्याची बाब पीडितेपासून लपवली