महाराष्ट्र

रायगड; 1725 कोटी रुपयांचे तब्बल 22 टन हेरॉईन जप्त, दिल्ली पोलिसांनी केली मोठी कारवाई

रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत

वृत्तसंस्था

रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 1725 कोटी रुपयांचे तब्बल 22 टन हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. या सर्व वस्तू एका कंटेनरमधून जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती.

तपासादरम्यान या दोघांकडून अनेक खुलासे झाले आहेत. त्याआधारे पोलिसांनी 1200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मुंबई बंदरात एक कंटेनर असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन्ही आरोपींसह न्हावाशेवा बंदरात दाखल होऊन कारवाई करत तब्बल 22 टन हेरॉईन जप्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारमूल्यानुसार हेरॉईनची एकूण किंमत १७२५ कोटी आहे. अंमली पदार्थ देशात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिसांचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार