महाराष्ट्र

यवतमाळ जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले ; हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात येणार

हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट

नवशक्ती Web Desk

यवतमाळ जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांना पुराने वेढले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे ४५ लोक अडकले आहेत. या अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे

यवतमाळमधील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर नागपुरात पोहोचणार आहेत. त्यानंतर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आपण तातडीने महागावला रवाना होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत, असेही फडणवीस म्हणाले आहेत. यवतमाळमधील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलला

‘ऑक्टोबर हिट’ने मुंबईकर घामाघूम! तापमान ३२; पण भास ४१चा... सोशल मीडियावर भावनांचा भडका

कांदळवनांची जमीन वन विभागाच्या ताब्यात द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा सरकारला सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा; दिवाळीनंतर पुन्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार

छत्तीसगडमध्ये २१० नक्षलवाद्यांची शरणागती; संविधान हातात घेत पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली