संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

पाऊस पाडू नको असा आता परमेश्‍वरालाच आदेश द्यायचा काय? याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल

राज्यात मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या पूरग्रस्त स्थितीवर मात करण्यास दरवर्षी सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून केंद्र आणि राज्य सरकारला कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांला उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले.

Swapnil S

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या पूरग्रस्त स्थितीवर मात करण्यास दरवर्षी सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून केंद्र आणि राज्य सरकारला कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांला उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने राज्यात पाऊस पाडू नको असे आता परमेश्‍वरालाच आदेश द्यायचा काय? असा खरमरीत सवाल याचिकाकर्त्यांला केला. तसेच राज्याच्या मुख्य सचिवांकडे दाद मागा, असा सबुरीचा सल्ला देत याचिका निकाली काढली.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला निर्देश द्या, अशी मागणी करीत सुशांत पाटील यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. त्यावर सोमवारी देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली