महाराष्ट्र

गणेशोत्सवादरम्यान पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार ; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी मंडळांना वेळेत मिरवणुका पार पाडण्याची विनंती केली.

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य मंत्री मंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा धडाका लावला आहे. अजित पवार यांनी पुण्यावर आपलं विशेष लक्ष केल्याचं दिसून येत आहे. आता पुणे मेट्रो संबंधात त्यांनी एक नवा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी मंडळांना वेळेत मिरवणुका पार पाडण्याची विनंती केली. तर यंदा गणेशोत्सवादरम्यान पुणे मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा देखील अजित पवार यांनी केली.

यावेळी बोलता त्यांनी दहीहंडीच्या वेळेत गोविंदा पथकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं. गणपती विसर्जन हे वेळेवर होण्यासाठी त्यांनी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक दुपारी ४.३० वाजता निघणार असल्याचं सांगण्यात आलं. यंदाचा गणेशोत्वस हा दणक्यात साजरी होणार असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले. त्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज होणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

चंद्राकांत पाटील नाराज असल्याच्या चर्चा

अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर आपलं लक्ष पुण्यावर केंद्रीत केलं आहे. मध्यंतरी त्यांना पुण्याच्या पालकमंत्री पदी विराजमान केलं जाणार असल्याच्याही चर्चा जोर धरु लागल्या होत्या. अशात अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्री केल्यास पुण्यातील भाजपची ताकद कमी होऊन राष्ट्रवादीची ताकद वाढेल असं देखील बोललं जाऊ लागलं. तसंच अजित पवारांच्या पुण्यात हस्तक्षेपाने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील नाराज असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं आहे.

आज पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी चंद्राकांत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चांना पुर्णविराम दिला. ते म्हणाले की, "चंद्रकांत दादा मुद्दाम बोलत नाही असं नाही. कधीकधी आमच्या वेळा जुळुन येत नाही. पण आम्ही सगळेजण खेळीमेळीने काम करतो. मुख्यमंत्री आणि आमच्यात योग्य समन्वय आहगे. पुणेकरांचा उस्तव चांगल्या पद्धतीने पार पडावा यासाठी आज आम्ही बैठकीला आलो आहोत. याचा अर्थ असा नाही की आण्ही नाराज आहोत." असं म्हणत अजित पवार यांनी नाराजीच्या चर्चांना पुर्णविराम दिला.

भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी केंद्र सरकारचे नवे नियम; व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी नोंदणी आवश्यक, जाणून घ्या सविस्तर

'फी भरली नाही' म्हणून मित्र-मैत्रिणींसमोर अपमान; १७ वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, मृत्यूपूर्वीचा Video व्हायरल, शिक्षकांविरोधात गुन्हा

Mumbai : सीएसएमटी ते बोरिवली प्रवास होणार सोपा! हार्बर लाईन विस्तार प्रकल्पाला वेग; पश्चिम रेल्वेकडून ८६.५१ कोटींची निविदा

Thane Traffic Update : नौपाडा परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; ३० जूनपर्यंत नवे नियम लागू

Monsoon Travel Alert : मुंबईहून गोवा-केरळ ट्रिप प्लॅन करताय? कोकण रेल्वेने बदलले अनेक गाड्यांचे वेळापत्रक; प्रवासापूर्वी 'हे' नक्की वाचा