Twitter 
महाराष्ट्र

नाशिकमध्ये भूकंपाचे झटके,प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले आहे.

वृत्तसंस्था

नाशिकमध्ये पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र तेथील परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले आहे. गुरुवारी रात्री ११ ते १२.३० च्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, उत्पादन व मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही, अशी माहिती उपजिल्हा दंडाधिकारी भागवत डोयफोडे यांनी दिली.

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर नाशिकच्या पेठ तालुक्यात हरसूल येथे भूकंपाची तीव्रता जाणवली. पेठ तालुक्यातील खरपडी, नाचलोंढी, धानपाडा भागात तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा, खैरपल्ली या गावांनाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. २१ जुलै रोजी रात्री ११ वाजता एका मिनिटात २.४ रिश्टर स्केलचे दोन धक्के तर दुपारी १२.३० वाजता तीन मिनिटांत ३ रिश्टर स्केलचे दोन धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत