Twitter 
महाराष्ट्र

नाशिकमध्ये भूकंपाचे झटके,प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले आहे.

वृत्तसंस्था

नाशिकमध्ये पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र तेथील परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले आहे. गुरुवारी रात्री ११ ते १२.३० च्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, उत्पादन व मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाले नाही, अशी माहिती उपजिल्हा दंडाधिकारी भागवत डोयफोडे यांनी दिली.

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर नाशिकच्या पेठ तालुक्यात हरसूल येथे भूकंपाची तीव्रता जाणवली. पेठ तालुक्यातील खरपडी, नाचलोंढी, धानपाडा भागात तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा, खैरपल्ली या गावांनाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. २१ जुलै रोजी रात्री ११ वाजता एका मिनिटात २.४ रिश्टर स्केलचे दोन धक्के तर दुपारी १२.३० वाजता तीन मिनिटांत ३ रिश्टर स्केलचे दोन धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन तहसीलदार संदीप भोसले यांनी केले आहे.

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन, २० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण

Mumbai : मध्य रेल्वेकडून दरवाढीचा प्रस्ताव रद्द; रेल्वे स्टॉलवरील वडा पाव-समोसा जुन्याच किंमतीत मिळणार

Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला