महाराष्ट्र

डबल इंजिन सरकारमुळेच सर्व शक्य, मोदींनी केले शिंदे-फडणवीस जोडीचे कौतुक

प्रतिनिधी

डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत आणि यावेळी त्यांनी BKC येथे आयोजित सभेत हे सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. बीकेसी येथील सभेत पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.

सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशभरातील रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी मिशन मोडमध्ये काम सुरू आहे. महाराष्ट्रातील मुंबई लोकल आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीलाही याचा फायदा होत आहे. ते म्हणाले, "दुहेरी इंजिन असलेल्या सरकारला सामान्य माणसाला त्याच आधुनिक सुविधा, तीच स्वच्छता आणि विकासाचा तोच वेग द्यायचा आहे. त्यामुळेच आज रेल्वे स्थानकांचाही विमानतळाप्रमाणे विकास केला जात आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही विकास केला जात आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस