महाराष्ट्र

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

सांगली जिल्ह्यातील शाळगाव येथील एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीत ९ जण अत्यवस्थ झाले होते, मात्र यातील दोन जण किरकोळ जखमी झाले. अन्य ७ जणांना रात्री उशिरा कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Swapnil S

कराड : सांगली जिल्ह्यातील शाळगाव येथील एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीत ९ जण अत्यवस्थ झाले होते, मात्र यातील दोन जण किरकोळ जखमी झाले. अन्य ७ जणांना रात्री उशिरा कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असतानाच त्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ५ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सुचिता उथळे (वय ५०), नीलम रेठरेकर (वय २६) अशी मृत महिलांची नावे आहेत. दरम्यान, या वायू गळतीचे कारण समजू शकले नाही.

म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्यामुळे आग लागल्याने ९ कामगार आत अडकून पडले. या घटनेची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच कडेगावचे तहसीलदार शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे व माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देत सर्व प्रकारच्या मदतीबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा

Mira Road : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मद्यपान करणाऱ्यांना मनसेचा दणका; VIDEO व्हायरल

हनिमूनला अख्खं कुटुंबच घेऊन गेला; पत्नीने थेट घटस्फोट मागितला

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : 'मीटरने चला' म्हटलं तर ३०० रुपयांची मागणी! BKC सार्वजनिक वाहतूक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांविरोधात तक्रारी