महाराष्ट्र

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

सांगली जिल्ह्यातील शाळगाव येथील एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीत ९ जण अत्यवस्थ झाले होते, मात्र यातील दोन जण किरकोळ जखमी झाले. अन्य ७ जणांना रात्री उशिरा कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Swapnil S

कराड : सांगली जिल्ह्यातील शाळगाव येथील एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीत ९ जण अत्यवस्थ झाले होते, मात्र यातील दोन जण किरकोळ जखमी झाले. अन्य ७ जणांना रात्री उशिरा कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असतानाच त्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ५ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सुचिता उथळे (वय ५०), नीलम रेठरेकर (वय २६) अशी मृत महिलांची नावे आहेत. दरम्यान, या वायू गळतीचे कारण समजू शकले नाही.

म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्यामुळे आग लागल्याने ९ कामगार आत अडकून पडले. या घटनेची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच कडेगावचे तहसीलदार शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे व माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देत सर्व प्रकारच्या मदतीबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला