महाराष्ट्र

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

सांगली जिल्ह्यातील शाळगाव येथील एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीत ९ जण अत्यवस्थ झाले होते, मात्र यातील दोन जण किरकोळ जखमी झाले. अन्य ७ जणांना रात्री उशिरा कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Swapnil S

कराड : सांगली जिल्ह्यातील शाळगाव येथील एमआयडीसीतील म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याने लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीत ९ जण अत्यवस्थ झाले होते, मात्र यातील दोन जण किरकोळ जखमी झाले. अन्य ७ जणांना रात्री उशिरा कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असतानाच त्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ५ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सुचिता उथळे (वय ५०), नीलम रेठरेकर (वय २६) अशी मृत महिलांची नावे आहेत. दरम्यान, या वायू गळतीचे कारण समजू शकले नाही.

म्यानमार केमिकल कंपनीत वायू गळती झाल्यामुळे आग लागल्याने ९ कामगार आत अडकून पडले. या घटनेची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच कडेगावचे तहसीलदार शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे व माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देत सर्व प्रकारच्या मदतीबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक