महाराष्ट्र

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नारायणगाव बायपासजवळ शनिवारी (दि. २०) सकाळी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याची घटना घडली.

नेहा जाधव - तांबे

नारायणगाव बायपासजवळ शनिवारी (दि. २०) सकाळी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याची घटना घडली. अचानक सुरू झालेल्या या गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली.

सकाळी अंदाजे १० वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या गॅस टँकरमधून सुरुवातीला थोड्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला. काही वेळातच गळतीचा वेग वाढला आणि गॅस हवेत मोठ्या प्रमाणावर पसरला. घाणेरडा वास पसरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून टँकरचालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले.

पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची धावपळ

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्याप गळतीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गळती थांबवण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू आहेत.

वाहतूक विस्कळीत, नागरिकांत भीती

पुणे-नाशिक जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. गॅस गळती झाल्याने वाहनचालकांसह प्रवासी आणि आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही वेळासाठी रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अशा घटना वारंवार घडत असल्याने CNG आणि इतर गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गळती थांबवण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्नशील आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत