महाराष्ट्र

राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर

सर्वोच्च न्यायालयाने जे जिल्हे किंवा विभाग पावसामुळे प्रभावित होणार नाहीत. किंवा जिथे तुरळक पाऊस असतो, अशा ठिकाणी निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते

प्रतिनिधी

राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासूनच लागू झाली आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा या १७ जिल्ह्यांतील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणूका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे जिल्हे किंवा विभाग पावसामुळे प्रभावित होणार नाहीत. किंवा जिथे तुरळक पाऊस असतो, अशा ठिकाणी निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक