महाराष्ट्र

राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर

सर्वोच्च न्यायालयाने जे जिल्हे किंवा विभाग पावसामुळे प्रभावित होणार नाहीत. किंवा जिथे तुरळक पाऊस असतो, अशा ठिकाणी निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते

प्रतिनिधी

राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासूनच लागू झाली आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा या १७ जिल्ह्यांतील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणूका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे जिल्हे किंवा विभाग पावसामुळे प्रभावित होणार नाहीत. किंवा जिथे तुरळक पाऊस असतो, अशा ठिकाणी निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली

पाक लष्कराचा स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला; खैबर पख्तूनख्वात ३० जणांचा बळी

आता नोकरी मिळवणे होणार सोपे! केंद्र सरकार तयार करतेय ‘डॅशबोर्ड’

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश