महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ एक्स @harshsapkal
महाराष्ट्र

हिंदीची सक्ती हे षडयंत्र - सपकाळ

शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय म्हणजे मराठीला मागे टाकण्याचा आणि भारतीय संविधानात नमूद असलेल्या भाषिक विविधतेचा अंत करण्याचा भाजप-आरएसएसचा अजेंडा आहे, असा आरोप राज्य काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केला.

Swapnil S

मुंबई : शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय म्हणजे मराठीला मागे टाकण्याचा आणि भारतीय संविधानात नमूद असलेल्या भाषिक विविधतेचा अंत करण्याचा भाजप-आरएसएसचा अजेंडा आहे, असा आरोप राज्य काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केला.

हा केवळ भाषिक धोरणाचा मुद्दा नाही. भाजप आणि आरएसएसचा अजेंडा म्हणजे इतर सर्व भाषा नष्ट करून संपूर्ण देशात हिंदीचे वर्चस्व प्रस्थापित करणे आहे. पण आम्ही मराठीचा गळा दाबू देणार नाही. हे फसवे षडयंत्र आम्ही हाणून पाडू. आम्ही हिंदीचा आदर करतो, पण ती जबरदस्तीने लादली जाणे आम्हाला मान्य नाही. मराठी ही केवळ आमची भाषा नाही, ती आमची ओळख आणि जीवनशैली आहे, असे सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सपकाळ यांनी सांगितले की, काँग्रेसने महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना पत्र लिहून या हिंदी भाषेच्या सक्ती आदेशाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सरकारवर हा आदेश मागे घेण्यासाठी दबाव आणता येईल.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक