लाखांचा अपहार संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

रेल्वेच्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करणे पडले महागात; हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला दोन लाखांचा दंड

रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने दणका दिला.

Swapnil S

मुंबई : रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने दणका दिला. तब्बल ७७ वर्षांनी याचिका दाखल करून न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून आर्थिक फायदा उठवण्याचा हेतू यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. याबाबत कठोर धडा शिकवण्याची गरज आहे, असे मत नोंदवत न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावताना याचिका फेटाळून लावली.

पुणे येथील रहिवाशी असलेल्या सतीश शहा याने १९४७ मध्ये रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर आपला मालकी हक्क असल्याचा दावा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्याने आपण १९९३ मध्ये जमीन खरेदी केली होती. त्यावेळी रेल्वे प्रकल्पासाठी आधीच जमीन संपादित करण्यात आली होती, याची आपल्याला कल्पना नव्हती, असा दावा करताना १९४७ मध्ये करण्यात आलेल्या विविध करारांवर तब्बल ७७ वर्षांनी डिसेंबर २०२२ मध्ये आक्षेप घेत याचिका दाखल केली.

Mumbai : कचरा टाकणाऱ्या ठिकाणी CCTVची नजर; बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करा, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे सक्त निर्देश

राज्यात १२ नवीन डायलिसिस केंद्रे; किडनी रुग्णांना दिलासा

केंद्रीय शाळांसाठी मोफत सरकारी जागा; राज्य सरकारचा निर्णय

AIचा वापर आणि रोजगार... दोन्हीही वाढणार; राज्याचे कृत्रिम बुद्धिमता धोरण जाहीर, ५ वर्षात १० हजार कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख रोजगाराचे ध्येय

ठाकरे गटाची दानवेंना उमेदवारी, काँग्रेस संतप्त; विधानपरिषद निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे