लाखांचा अपहार संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

रेल्वेच्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करणे पडले महागात; हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला दोन लाखांचा दंड

रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने दणका दिला.

Swapnil S

मुंबई : रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने दणका दिला. तब्बल ७७ वर्षांनी याचिका दाखल करून न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून आर्थिक फायदा उठवण्याचा हेतू यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. याबाबत कठोर धडा शिकवण्याची गरज आहे, असे मत नोंदवत न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावताना याचिका फेटाळून लावली.

पुणे येथील रहिवाशी असलेल्या सतीश शहा याने १९४७ मध्ये रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर आपला मालकी हक्क असल्याचा दावा करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्याने आपण १९९३ मध्ये जमीन खरेदी केली होती. त्यावेळी रेल्वे प्रकल्पासाठी आधीच जमीन संपादित करण्यात आली होती, याची आपल्याला कल्पना नव्हती, असा दावा करताना १९४७ मध्ये करण्यात आलेल्या विविध करारांवर तब्बल ७७ वर्षांनी डिसेंबर २०२२ मध्ये आक्षेप घेत याचिका दाखल केली.

नसरापूर अत्याचार प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

नसरापूर निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "अशा नराधमांना...

CBSE चा मोठा निर्णय! दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा धोरणातून सूट; नववीतील विद्यार्थ्यांसाठीही नवे नियम

WhatsApp वापरताय? एका चुकीच्या क्लिकमुळे बँक खाते होईल रिकामे; CERT-In चा गंभीर इशारा

श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर नारायणगावकर कुटुंबीयांची नाराजी; चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी