महाराष्ट्र

जळगाव महापालिकेत निष्ठावंतांना स्वीकृत पद; प्रत्येक वर्षी किमान सात जणांना लॉटरी

जळगाव महापालिका निवडणुकीत ६५ पैकी ६९ जागा जिंकून एकतर्फी सत्ता मिळविल्यानंतर महायुतीने आपल्या निष्ठावंत आणि नाराज कार्यकर्त्यांना एक वर्षासाठी स्वीकृत सदस्यत्व देण्याची योजना आखली आहे. याप्रकारे प्रत्येक वर्षी किमान सात स्वीकृत नगरसेवकपदांची नियुक्ती केली जाईल, म्हणजे पाच वर्षांत ३५ जणांना ही संधी मिळेल.

Swapnil S

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत ६५ पैकी ६९ जागा जिंकून एकतर्फी सत्ता मिळविल्यानंतर महायुतीने आपल्या निष्ठावंत आणि नाराज कार्यकर्त्यांना एक वर्षासाठी स्वीकृत सदस्यत्व देण्याची योजना आखली आहे. याप्रकारे प्रत्येक वर्षी किमान सात स्वीकृत नगरसेवकपदांची नियुक्ती केली जाईल, म्हणजे पाच वर्षांत ३५ जणांना ही संधी मिळेल.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते आणि ज्येष्ठ निष्ठावंत उमेदवार उत्सुक होते, परंतु सर्वांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. काहींनी बंडखोरी केली, तर काहींनी नाराजी व्यक्त करूनही पक्षाचे काम सुरू ठेवले. त्यांचा एकनिष्ठपणा आणि कामाची निष्ठा ओळखून दरवर्षी सात जणांना स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्त केले जाणार आहे.

निवडणुकीत भाजपला ४६, तर शिवसेना (शिंदे गट) ला २२ जागा मिळाल्या. महापालिकेतील ७५ सदस्यांच्या हिशोबाने स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करताना प्रमाण निश्चित केले जाईल. यंदा महापालिकेत स्त्री शक्तीची ताकदही वाढली आहे. ७५ सदस्यांच्या सभागृहात ३९ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. यामध्ये भाजपचे २४, शिवसेना (शिंदे गट) चे ११, उबाठा ३, अपक्ष १ महिला सभासद आहेत.महिलांनी महापालिकेतील कारभारात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, कारण आतापर्यंत त्यांच्या दैनंदिन समस्यांकडे महापालिकेने गंभीरपणे लक्ष दिलेले नव्हते. आता ३९ महिला सभासदांच्या उपस्थितीत महिला मुद्द्यांना अधिक प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा आहे.

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या त्या वेळच्या सगळ्या आमदारांना अपात्र करा; सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

मराठवाड्यात दाटले दुष्काळाचे ढग; ११ मोठ्या धरणांमध्ये ६९ टक्के पाणीसाठा

Mumbai : तीन वर्षांत एसी लोकलची तयारी; आयसीएफ १२०, आरसीएफ ७१, एमसीएफ ४७ रेक तयार करणार

महापौरांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड; शैक्षणिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र

व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा; ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम, ३,९९५ वाहनचालकांची तपासणी