जळगावात रोज ३५ हजार किलो लाकडांची विक्री; गोवऱ्यांची विक्रीही वाढली 
महाराष्ट्र

जळगावात रोज ३५ हजार किलो लाकडांची विक्री; गोवऱ्यांची विक्रीही वाढली

इराण-अमेरिका युध्दाचा फटका हा व्यावसायिक आणि घरघुती गॅस सिलिंडर वितरणाला बसला आहे. गॅस टंचाई अभावी हॉटेल चालक आणि सामान्य नागरिक हा पारंपारिक चुलीकडे वळला आहे.परिणामत: शहरात सरपणाच्या लाकडाची मोठया प्रमाणावर मागणी आलेली आहे. पूर्वी दररोज ३००० किलो विकले जाणारे हे सरपण आता दररोज ३५ हजार किलो विकले जात आहे. पाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गोवऱ्यांची मागणी वाढली आहे.

Swapnil S

जळगाव : इराण-अमेरिका युध्दाचा फटका हा व्यावसायिक आणि घरघुती गॅस सिलिंडर वितरणाला बसला आहे. गॅस टंचाई अभावी हॉटेल चालक आणि सामान्य नागरिक हा पारंपारिक चुलीकडे वळला आहे.परिणामत: शहरात सरपणाच्या लाकडाची मोठया प्रमाणावर मागणी आलेली आहे. पूर्वी दररोज ३००० किलो विकले जाणारे हे सरपण आता दररोज ३५ हजार किलो विकले जात आहे. पाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गोवऱ्यांची मागणी वाढली आहे.

व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई ही शहरात मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी पर्याय शोधला आहे. हॉटेल, खानावळी आणि सामान्यांच्या घरात चुली पेटायला लागल्या आहेत.

या मातीच्या चुलींना मागणी आलेली आहे. या गॅस टंचाईमुळे सरपणाचा मोठा साठा करण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे. लाकडाच्या वखारीतून लाकडाला मोठी मागणी असल्याचे सांगण्यात येते.

या वखारींमध्ये लाकडाचा पुरेसा साठा असल्याचे वखार मालकांकडून सांगण्यात आले. दहा दिवसांपूर्वी वखारीतून दररोज तीन हजार किलो लाकडाची विक्री होत असे. आता गॅस टंचाईने अचानक मागणी वाढून ती दररोज ३५ हजार किलोपर्यंत गेलेली आहे. अनेक नागरिक लाकडा ऐवजी गोवरीचा वापर करण्यास पसंती दिली आहे. एक गोवरी ही ३० मिनिटे जळते. पाच ते सहा गोवऱ्यावर चार माणसांचा स्वयंपाक होतो. आज शहरात हजार ते १५०० गोवऱ्यांची दररोज विक्री होत आहे .

जळगाव शहरात वरण बट्टीची मोठया प्रमाणावर विक्री होते. रेडिमेड वरण बट्टी विकणारी पन्नासवर दुकाने आहेत. गॅस पुरवठा होत नसल्याने या व्यावसायिकांनी काकडाच्या भट्टीचा आधार घेतला आहे. काहींनी थेट रस्त्यावर भटटया लावल्या आहेत. या

लाकडाच्या भट्टीत बट्टी वाफवली जात आहे. विशेष म्हणजे गॅस वरील तयाार होणाऱ्या बट्टीपेक्षा लाकडाच्या चुलीवरील बट्टीला अधिक पसंती मिळत आहे.

गॅस अभावी हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलमधील मेनूत बदल केला आहे. जास्त गॅस लागणारे पदार्थ बनवणे सध्या बंद केले आहे. यात चायनिज, उतप्पा, डोसा, पराठे यांचा समावेश असून त्या ऐवजी पोहे, मिसळ, उपमा, इडली सांबार मेनूकार्डवर दिसत आहेत.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन