Jalna : ब्राह्मण समाजातर्फेही आजपासून उपोषण 
महाराष्ट्र

Jalna : ब्राह्मण समाजातर्फेही आजपासून उपोषण

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून (२९ ऑगस्ट) जालन्यातील महात्मा गांधी चमन येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा कार्यकर्ते दीपक रणनवरे यांनी केली आहे.

Swapnil S

जालना : ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून (२९ ऑगस्ट) जालन्यातील महात्मा गांधी चमन येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा कार्यकर्ते दीपक रणनवरे यांनी केली आहे.

परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली असली, तरी अद्याप पुरेसे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत. या महामंडळासाठी सरकारने १,००० कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करावा, ही रणनवरे यांची मुख्य मागणी आहे. यापूर्वीही त्यांनी महामंडळाच्या विविध मागण्यांसाठी दोन वेळा आंदोलने केली आहेत.

परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी १,००० कोटी रुपयांचा शासकीय निधी मंजूर करावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांवरून वाढवून १५ लाख रुपये करावी, ब्राह्मण समाजातील मुला-मुलींना मोफत शिक्षण द्यावे तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सेंटर्स सुरू करावेत, अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या धर्तीवर ब्राह्मण समाजाविरोधात होणाऱ्या जातीवाचक शिवीगाळ व छळापासून संरक्षण देणारा विशेष कायदा करावा, या प्रमुख मागण्या असून त्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा रणनवरे यांनी घेतला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये पुन्हा महापुराची भीती! मृतांचा आकडा ५४७ वर; ३२० भारतीय बेपत्ता; ४०० जण तिबेटच्या सीमेवर अडकले

Nepal Floods : राज्यातील ६० पर्यटकांशी अद्याप संपर्क नाही; २९० जण सुरक्षित, १०५ जण भारताच्या दिशेने रवाना

Maratha Reservation : मागण्या न मानल्यास 'वर्षा'समोर आंदोलन; मनोज जरांगेंचा इशारा, आजपासून उपोषण

Mumbai : दूध १०२ रुपये लिटर; घाऊक दरात ९ रुपये वाढ; १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार

मुंबईत 'पार्किंग' महागणार, १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव; पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी होणार सादर