महाराष्ट्र

Maratha Reservation: आंदोलनाला हिंसक वळण येतं असल्यानं जरांगे आज पासून पिणार पाणी....

मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यात काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे एक पत्रकार परिषद घेणार आहेत.

नवशक्ती Web Desk

राज्यात मराठा आरक्षणासाठी लोकांनी हिंसक रूप धारण केलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी इथं आमरण उपोषण सुरु केलं. आज जरांगे यांचा उपोषणाचा सातवा दिवस असून त्याची प्रकृती खालावत आहे. राज्यातील मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहेत. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आता मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. आंदोलनाला हिंसक वळण येत असल्यानं आंदोलकांच्या आग्रहान जरांगे पाणी घेणार आहेत. पाणी घेतं नसल्यानं तब्येत खालावत असल्याने आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगे यांनी आता हा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यात काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे एक पत्रकार परिषद घेणार आहेत. जरांगे काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर थोड्याच वेळात माध्यमांशी बोलण्याचा निर्णय जरांगेनी घेतल आहे. जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर येतं आहे. मनोज जरांगे पाटील त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत तपशील देणार आहेत.

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार