महाराष्ट्र

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच ; विधान परिषदेत दिली लेखी कबुली

नवशक्ती Web Desk

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडसाठी निवडलेली जागा राज्य सरकारची असल्याची माहिती आज विधान परिषदेत सरकारने दिली आहे. ही जागा केंद्र सरकारची असल्याचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. आरे वाचवा मोहिमेतील कार्यकर्त्यांनी, पर्यावरणवाद्यांनी या जागेत आरे मेट्रो कारशेड बनवण्यात यावं, अशी मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरेतील कारशेडला स्थगिती देऊन कांजूर येथील जागेवर कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली होती.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत कांजूरमार्ग येथील जागेबाबत तारांकित प्रश्न विचारला असता राज्य सरकारकडून या प्रश्नाला लेखी उत्तर देण्यात आलं आहे. या उत्तरात ही जागा राज्य सरकारची असल्याची कबूली सरकारने दिली आहे. या जागेवर केंद्र सरकारने तसंच एका खासगी व्यक्तीने दावा केला होता. हे प्रकरण हाय कोर्टापर्यंत गेले होतं. यात हायकोर्टाने खासगी व्यक्तीने केलेला दावा खोडून काढला होता.

कांजूरमार्गची जागा राज्य सरकारची असल्याची लेखी कबूली दिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कांजूरमार्गच्या जागेवर मेट्रो कारशेड केल्याने, वेळ, पैसा वाचला असता आणि आज कारशेड पूर्ण झालं असतं. मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे उभारलं असत तर चार मेट्रो लाईन एकत्र आल्या असत्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांनी मेट्रोबाबत राजकारण का केलं, असा सवाल करत विरोधकांनी राजकारण केलं नसतं तर आज आरे वाचलं असतं, असं ते म्हणाले.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच