महाराष्ट्र

केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही सुखरूप वाचलो! कराड तालुक्यातील हेळगावचे १७ पर्यटक सुखरूप

काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम येथील बैसरण घाटी परिसरात लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मंगळवारी भ्याड हल्ला केला.

Swapnil S

कराड : काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम येथील बैसरण घाटी परिसरात लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मंगळवारी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याच्या घटनेपासून केवळ एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सातारा जिल्ह्यातील सुमारे १७ पर्यटक सुखरूप असल्याचे थेट काश्मीरमधून कराड तालुक्यातील हेळगाव येथील भरत सूर्यवंशी आणि अमोल पवार यांनी दूरध्वनीवरून सांगितले. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये मूळचे सातारा जिल्ह्यातील बुधवारी ता खटाव येथील संतोष एकनाथ जगदाळे यांचाही समावेश आहे.

दरम्यान, त्या घटनेचा चित्त थरारक अनुभव डोळ्यांतील आसवे आवरत व दाटल्या गळ्याने सांगितला आणि केवळ दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही बचावलो, मात्र पर्यटकावर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. याबाबत माहिती सांगताना भरत सूर्यवंशी म्हणाले, मंगळवारी आम्ही पेहलगाममधील ज्या ठिकाणी हल्ला झाला ती बैसरण घाटी बघून अर्ध्या तासानंतर, वेरू व्हॅली बघितली नंतर चंदनवरी व्हॅली पहात होतो तेव्हा आम्हाला समजले इथे जवळच वरती आतंकवादी हमला झाला. तो आमच्यापासून केवळ २ किलोमीटर अंतरावरती झाला.

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू