महाराष्ट्र

कोयना धरण ५० टक्के भरले; उरमोडीतूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली आहे. अजूनही कोयना धारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत कोयनानगरला तब्बल १ हजार ५५१ तर महाबळेश्वरला १ हजार ४५३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कोयनेत तर ५३.६९ टीएमसी म्हणजे एकूण पाणी साठवण क्षमतेच्या (१०५.२५ टीएमसी) पन्नास टक्के पाणीसाठा झाला आहे.

Swapnil S

कराड : सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली आहे. अजूनही कोयना धारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत कोयनानगरला तब्बल १ हजार ५५१ तर महाबळेश्वरला १ हजार ४५३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कोयनेत तर ५३.६९ टीएमसी म्हणजे एकूण पाणी साठवण क्षमतेच्या (१०५.२५ टीएमसी) पन्नास टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण अर्धे भरले असून उरमोडी धरणाच्या चारही वक्र दरवाजातूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मागील १५ मेपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात संततधारसारखा पाऊस पडत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. तसेच या पावसामुळेच ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. त्यातच पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी यासारख्या प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस होत आहे. विशेष करून कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे.

मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयनानगर येथे २४ मिलिमीटर पाऊस झाला तर नवजा येथे ३० आणि महाबळेश्वरला १६ मिलिमीटर पाऊस झाला आहे तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला १ हजार ५७५, महाबळेश्वरला १ हजार ४६९ आणि नवजाला १ हजार ३५४ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. अद्यापही कोयना धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने आवकही टिकून आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात २९ हजार ७९३ क्युसेक वेगाने पाणी येत होते तर धरणात ५१.७७ टक्के म्हणजे ५४.४९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

Iran Israel War : इराणच्या सर्वोच्च नेता निवडी‌वेळी इस्रायलचा हल्ला; लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई हल्ले

भारताकडे २५ दिवसांचा तेल साठा; केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती

Iran Israel War : आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन

आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही; JNPT त अडकले शेकडो कंटेनर; दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प

मुंबईसह राज्यभर धुळवडीचा जल्लोष; राजकीय नेते, सेलिब्रिटीही रंगले रंगात