महाराष्ट्र

कोयना धरण ५० टक्के भरले; उरमोडीतूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली आहे. अजूनही कोयना धारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत कोयनानगरला तब्बल १ हजार ५५१ तर महाबळेश्वरला १ हजार ४५३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कोयनेत तर ५३.६९ टीएमसी म्हणजे एकूण पाणी साठवण क्षमतेच्या (१०५.२५ टीएमसी) पन्नास टक्के पाणीसाठा झाला आहे.

Swapnil S

कराड : सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली आहे. अजूनही कोयना धारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत कोयनानगरला तब्बल १ हजार ५५१ तर महाबळेश्वरला १ हजार ४५३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कोयनेत तर ५३.६९ टीएमसी म्हणजे एकूण पाणी साठवण क्षमतेच्या (१०५.२५ टीएमसी) पन्नास टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण अर्धे भरले असून उरमोडी धरणाच्या चारही वक्र दरवाजातूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मागील १५ मेपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात संततधारसारखा पाऊस पडत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. तसेच या पावसामुळेच ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. त्यातच पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी यासारख्या प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस होत आहे. विशेष करून कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे.

मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयनानगर येथे २४ मिलिमीटर पाऊस झाला तर नवजा येथे ३० आणि महाबळेश्वरला १६ मिलिमीटर पाऊस झाला आहे तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला १ हजार ५७५, महाबळेश्वरला १ हजार ४६९ आणि नवजाला १ हजार ३५४ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. अद्यापही कोयना धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने आवकही टिकून आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात २९ हजार ७९३ क्युसेक वेगाने पाणी येत होते तर धरणात ५१.७७ टक्के म्हणजे ५४.४९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली