महाराष्ट्र

अंतवाली सराटीत लाठीचार्ज नेमका कोणाच्या सांगण्यावरुन? माहितीच्या अधिकारात महत्वाची माहिती समोर

जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

नवशक्ती Web Desk

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाचं पेटला आहे. जालन्यातीर अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्च झाला होता. या लाठीचार्जबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आंदोलकांवर जो जालन्यात लाठीचार्ज झाला त्याचे आदेश कुणी दिले होते. याची माहिती पोलिसांकडून मागवली होती. त्यावर आता जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी माहिती ही दिली आहे. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश नाहीत असं त्यात म्हटलं गेलं आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी 23 ऑगस्ट २०२३ रोजी पोलिसांकडून आंदोलनकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला होता. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर त्यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि तसा आदेश गृहमंत्रालयाकडून दिला गेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही जालन्यातील घटनेवरून फडणवीसांवर अनेकांनी आरोप केले होते.

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन, २० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण

Mumbai : मध्य रेल्वेकडून दरवाढीचा प्रस्ताव रद्द; रेल्वे स्टॉलवरील वडा पाव-समोसा जुन्याच किंमतीत मिळणार

Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला