संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेच्या रकमेत दहापट वाढ करणार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा टोला

निवडणूक जवळ आली की, लाडकी बहीण योजनेच्या रकमेत दहापट वाढ करतील, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुतीला लगावला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करणार अशी शक्यता होती. मात्र लोकसभा निवडणुकीत जनतेने मतदानातून महायुतीला धक्का दिल्याने राज्यातील जनतेची महायुतीने धास्ती घेतली आहे. निवडणूक जवळ आली की, लाडकी बहीण योजनेच्या रकमेत दहापट वाढ करतील, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुतीला लगावला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये या योजनेचे काय झाले, असा उलट सवाल दानवे यांनी महायुतीला केला.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधीही घेतली तरी महायुतीचा पराभव निश्चित आहे. २६ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते, त्याआधी महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे. त्यामुळे निवडणूक आयोगाला त्याआधी निवडणुका घ्याव्या लागतील, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात टाकण्यासाठी निवडणूक लांबवली जात असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला. महाराष्ट्रातील बहिणींना लाभ मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र निवडणुकीसाठी हा खटाटोप सुरू आहे. ज्या राज्यातून या योजनेला सुरुवात झाली तिथे योजनेची काय स्थिती आहे ते पाहा, असा उलट सवाल दानवे यांनी महायुतीला केला.

Navi Mumbai Airport : पहिल्या दिवशी ३० विमानांची ये-जा; आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक कधीपासून? CIDCO उपाध्यक्षांनी दिली माहिती

भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार; अंतराळवीरांना २०४० पर्यंत चंद्रावर उतरवणार

BMC Elections: महापौरपदासाठी लॉटरी? आरक्षणाची माळ कोणत्या प्रवर्गाच्या गळ्यात पडणार? प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण होणार

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...

प्रतीक्षा संपली! Navi Mumbai Airport वरून अखेर विमानसेवा सुरू; पहिल्या विमानाला दिली खास सलामी; प्रवाशांना गिफ्टही - Video