महाराष्ट्र

Budget 2024: महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली -खा. अमोल कोल्हे

यंदाच्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश, बिहारवर सवलतींची खैरात करण्यात आली असताना महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसण्यात आल्याची धारदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

Swapnil S

यंदाच्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश, बिहारवर सवलतींची खैरात करण्यात आली असताना महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसण्यात आल्याची धारदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. डॉ. कोल्हे म्हणाले, “केंद्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो!!” असा आहे. ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर सरकार उभे आहे, त्या जेडीयू आणि टीडीपी या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करून बिहार आणि आंध्र प्रदेशवर सवलतींची, योजनांची खैरात करण्यात आली आहे. बिहार व आंध्र प्रदेशला निधी मिळतो, याविषयी कुणालाही दु:ख वाटण्याचे कारण नाही.

परंतु जो महाराष्ट्र देशाला सर्वाधिक महसूल देतो, त्या महाराष्ट्राच्या तोंडाला एनडीए सरकारने अक्षरश: पाने पुसली आहेत. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिल्लीवाऱ्या करीत असते. ते ट्रिपल इंजिन सरकार काय करते, असा प्रश्न यातून निर्माण होतो. ट्रिपल इंजिन सरकारची केंद्र सरकारमध्ये काही भूमिका आहे, असे आताच्या एनडीए सरकारला वाटत नाही का? जर वाटत असेल, तर महाराष्ट्राच्या वाट्याला भरघोस व घसघशीत दान का पडले नाही, अशा प्रश्नांची सरबत्तीही डॉ. कोल्हे यांनी केली. खरे तर महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री