एसटी भाडेवाढ अखेर रद्द; पूरपरिस्थितीमुळे सरकारचा निर्णय; प्रवाशांना दिलासा 
महाराष्ट्र

एसटी भाडेवाढ अखेर रद्द; पूरपरिस्थितीमुळे सरकारचा निर्णय; प्रवाशांना दिलासा

राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दिवाळी सणासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. सध्या खासगी वाहने वाढली असली तरीही एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. अनेक प्रवासी एसटीनेच प्रवास करतात.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

दिवाळीत एसटीच्या तिकिट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. मात्र ऐन दिवाळीत एसटीच्या प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागू नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन मंत्र्यांना भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीची १० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार