मनभेद नाही, केवळ मतभेद होते...झेडपी, मनपा निवडणुका महायुती एकत्रच लढणार : बावनकुळे; मुंबईत जागावाटपासाठी समन्वय समिती संग्रहित छायाचित्र (X/@cbawankule)
महाराष्ट्र

मनभेद नाही, केवळ मतभेद होते...झेडपी, मनपा निवडणुका महायुती एकत्रच लढणार : बावनकुळे; मुंबईत जागावाटपासाठी समन्वय समिती

जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असून, आम्ही ५१ टक्के मतांचा आकडा गाठून विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे.

Krantee V. Kale

नागपूर : जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असून, आम्ही ५१ टक्के मतांचा आकडा गाठून विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले असून, या निवडणुका महायुती एकत्रच लढणार," अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली.

त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, जिल्हा पातळीवरील सर्व नेत्यांना स्थानिक स्तरावर महायुतीची बांधणी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर ५ ते १० टक्के जागांवर काही अडचणी येऊ शकतात, मात्र त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बसून अंतिम निर्णय घेतील.

मनभेद नाही, केवळ मतभेद होते

अजित पवार हे महायुतीचाच अविभाज्य भाग असून ते आगामी लढाही सोबतच देणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले होते, मात्र ते आता पूर्णपणे दूर झाले आहेत. आमच्यात 'मनभेद' नव्हते, केवळ निवडणूकनिहाय 'मतभेद' होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भ विकासासाठी कटिबद्ध

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर आणि विकासावर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर विदर्भाचा झपाट्याने विकास झाला आहे. छोटे राज्य विकसित होऊ शकतात, यावर भाजपचा विश्वास असून विदर्भाला पूर्ण न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसने विदर्भाकडे दुर्लक्ष केल्यानेच त्यांचे या भागात पतन झाले आहे. विदर्भात सर्वाधिक जंगल असल्याने वन विभागाचे मुख्यालय (फॉरेस्ट कार्यालय) मुंबईत हलवले जाणार नाही, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.

"महाराष्ट्रात लहान मुलं-तरुणी पळवल्या जातायत..."; राज ठाकरेंची गंभीर चिंता, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ठोस कारवाईची मागणी

मुंबईकरांना मोठा दिलासा; २० हजार इमारतींना OC मिळण्याचा मार्ग मोकळा, सुधारित अभय योजनेची अंमलबजावणी सुरू

परदेशी पर्यटकांसाठी महाअतिथी पोर्टल; घरबसल्या बुकिंग, पर्यटनस्थळी सोयीसुविधा; पर्यटन विभागाचा पुढाकार

केवळ तीन दिवसांत चोरीचा छडा; मध्य रेल्वेच्या RPF ची उत्कृष्ट कामगिरी

मुंबईतील बाबुलनाथ मंदिराला नाममात्र दरात जागा; अवघ्या १ रुपयांत ३० वर्षांचे भाडेपट्टा नूतनीकरण