प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

राज्यात १२ ऑक्टोबरनंतर पावसाची 'एक्झिट'; ६ ते ८ दरम्यान पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

येत्या ६ ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बरसेल. ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान राज्यभर ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, १२ ऑक्टोबरनंतर मान्सून महाराष्ट्रातून परत फिरणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Swapnil S

पुणे : येत्या ६ ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बरसेल. ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान राज्यभर ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, १२ ऑक्टोबरनंतर मान्सून महाराष्ट्रातून परत फिरणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

यंदा मान्सूनचा प्रवास भारतात आणि महाराष्ट्रात लांबला आहे. ऑक्टोबरची सुरुवात झाली तरीही मान्सून वेळेत परतलेला नाही. नवरात्र आणि दसरा पावसात गेल्यामुळे, आता दिवाळीचा सण पावसात जाणार का, अशी चिंता सर्वसामान्य नागरिकांना सतावत होती. या परिस्थितीत हवामान विभागाने एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जारी केली आहे.

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधून कोसळणाऱ्या परतीच्या पावसाचा प्रभाव मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान पुन्हा जाणवेल. या कालावधीत राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवसांसाठी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. उर्वरित भागांमध्ये पावसाची उघडीप राहील. १२ ऑक्टोबरनंतर मान्सून महाराष्ट्रातून पूर्णपणे माघार घेणार आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून, अधूनमधून हलक्या सरी येत असल्या तरी मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. हवामान विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागांत ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी