महाराष्ट्र

महाराष्ट्राची लोकसंख्या पोहोचली १२.९३ कोटींवर; आर्थिक सर्वेक्षण अहवालात अंदाज

महाराष्ट्राची लोकसंख्या १ मार्च २०२६ रोजी १२.९३ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. २०११ च्या जनगणनेत नोंदवलेल्या ११.२४ कोटींपेक्षा ती जास्त आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राची लोकसंख्या १ मार्च २०२६ रोजी १२.९३ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. २०११ च्या जनगणनेत नोंदवलेल्या ११.२४ कोटींपेक्षा ती जास्त आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, भारताच्या १२१.०९ कोटी लोकसंख्येच्या ९.३ टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात होती. राज्यातील लोकसंख्येची घनता २०११ मध्ये प्रति चौरस कि.मी. ३६५ वरून मार्च २०२६ पर्यंत प्रति चौरस किमी ४२० पर्यंत वाढल्याचे महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये गुरुवारी राज्य विधिमंडळात मांडण्यात आले.

२०२६ मध्ये १२.९३ कोटी लोकसंख्येचा अंदाज आहे, त्यात ६.७३ कोटी पुरुष आणि ६.२० कोटी महिलांचा समावेश आहे. ग्रामीण लोकसंख्या ६.५५ कोटी आणि शहरी लोकसंख्या ६.३८ कोटी आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

राज्याचा शहरीकरणाचा दर ४५.२ टक्के (२०११ च्या जनगणनेनुसार) भारताच्या ३१.१ टक्क्यांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. १९६० मध्ये अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्या दर दशकभरात १९६१ मध्ये २८.२ टक्क्यांवरून २०११ मध्ये ४५.२ टक्क्यांपर्यंत वाढत आहे. ०-१४ वर्षे वयोगटातील मुलांचे प्रमाण २०११ मधील लोकसंख्येच्या २६.७ टक्क्यांवरून २०२६ पर्यंत १९.६ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, काम करणाऱ्या लोकसंख्येची संख्या (१५-५९ वर्षे) वाढत आहे, २०११ मधील ६३.३ टक्क्यांवरून २०२६ पर्यंत ६७.३ टक्के, असे अहवालात म्हटले आहे.

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

वरातीमधील डीजेच्या कर्कश आवाजामुळे १४० कोंबड्या मृत्युमुखी; कुक्कुटपालन व्यावसायिकाची पोलिसांकडे तक्रार दाखल

नवी मुंबई APMC त कलिंगड विक्रेते हवालदिल; अफवांमुळे विक्रीत ३० टक्के घट

भय्यांना मराठी शिकवून काय साध्य होणार? राज ठाकरे यांचा सवाल राज्यकर्त्यांवर आणि माध्यमांवरही टीका

हार्बर लाइनवर आजपासून १४ एसी लोकल फेऱ्यांची भर