महाराष्ट्र

राज्यात पावसाचा इशारा! अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह बरसणार; हवामान विभागाकडून 'यलो' आणि 'ऑरेंज अलर्ट' जारी; बघा डिटेल्स

राज्यभरात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई, पुणे, नाशिक, सातारा तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Swapnil S

पुणे : राज्यभरात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई, पुणे, नाशिक, सातारा तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईसाठी दोन दिवस पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. १४ मे रोजी या भागात ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणासाठीही 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून अहिल्यानगरसह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील घाट भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’

विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने बुधवार, १४ मे आणि गुरुवार १५ मेसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस विदर्भातील आकाश ढगांनी आच्छादलेले राहील. बुधवारी आणि गुरुवारी काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र; दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

राज्यात पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस

२७ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल, तसेच महाराष्ट्रात मान्सून ६ जूनच्या आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येते ५ दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील. जवळपास १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातसुद्धा जास्त पाऊस पडेल, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.

महाराष्ट्रात मान्सून कधी?

देशभरात गेले काही दिवस उष्णतेच्या लाटेमुळे वातावरणात मोठे बदल झाले आहेत. त्याचा परिणाम मान्सूनच्या आगमनावरही होणार अशी चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, मान्सून यंदा नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधीच अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता असून १३ मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केला होता. त्याप्रमाणे मंगळवारी मान्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे मंगळवारी (दि.१३ मे) नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निकोबार बेटांवर मागील २४ तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात ६ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश