मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, कर्जमाफी, जनहिताचे प्रश्न व विभागीय विकास आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा फड रंगला आहे. त्यानंतर जिल्हा परिषदा व महापालिकांचीही निवडणूक होणार आहे. त्याची घोषणा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य विधिमंडळाचे नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे हे अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.