संग्रहित छायाचित्र एक्स @CMOMaharashtra
महाराष्ट्र

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा; अर्थतज्ज्ञ मालमत्तेचे मूल्यांकन करणारी यंत्रणा उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती

पैशांचे आमिष दाखवून फसवणुकीच्या प्रकरणात वाढ झाली असून अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांच्या मदतीला अर्थतज्ज्ञ मालमत्तेचे मुल्यांकन करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : पैशांचे आमिष दाखवून फसवणुकीच्या प्रकरणात वाढ झाली असून अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांच्या मदतीला अर्थतज्ज्ञ मालमत्तेचे मुल्यांकन करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामुळे मालमत्तेचे मूल्यांकन करत तीची विक्री करणे सोयीस्कर होईल. तसेच आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात ७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा व १ लाखांहून अधिक दंडाच्या रकमेत वाढ करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान सभेत दिली. महाराष्ट्रातील हजारो ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मैत्रेय प्लॉट्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. आणि मैत्रेय सुपरस्ट्रक्चर्स प्रा. लि. या कंपन्यांविरोधात शासन निर्णायक आणि ठोस कारवाई करत आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी दिली. विधान सभा सदस्य अमोल खताळ, सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले.

मैत्रेय ग्रुप प्रकरणात २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदारांची सुमारे २५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत ३१ गुन्हे नोंदवले गेले असून ५६ आरोपींविरोधात कारवाई सुरू आहे. ४०९ प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३६० मालमत्तांच्या मूल्यांकनासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे.

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी