शक्तिपीठाच्या विरोधात कोल्हापुरात एल्गार (Photo-X/@satejp)
महाराष्ट्र

शक्तिपीठाच्या विरोधात कोल्हापुरात एल्गार

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.

Swapnil S

कोल्हापूर : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. कोल्हापुरात मंगळवारी हजारो शेतकरी, महिला आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला.

आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी ‘आमचे रक्त सांडले तरी चालेल, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही,’ असा आक्रमक निर्धार व्यक्त केला. मोर्चात काँग्रेस नेते सतेज पाटील, शेतकरी नेते राजू शेट्टी तसेच छत्रपती शाहू महाराज सहभागी झाल्याने आंदोलनाला मोठे राजकीय आणि सामाजिक बळ मिळाले.

मोर्चात ग्रामीण भागातील महिलांची मोठी उपस्थिती होती. राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार हा महामार्ग विदर्भातील वर्धा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा या भागापर्यंत जाणार आहे.

मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला मान्यता; सध्याच्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या वाढून ४५ होणार

Thane : ना आरोपपत्र, ना पीडितांना भरपाई; मुंब्रा रेल्वे अपघाताचे एक वर्ष, जखमी प्रवाशांनी गमावली नोकरी, झाले कर्जबाजारी

मान्सून दोन दिवसांत राज्यात होणार सक्रिय; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठ्याची शक्यता; पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांची माहिती

Chhatrapati Sambhajinagar : महिला अधिकाऱ्याच्या अंगावर कार घातली; गुटखाविरोधी कारवाईदरम्यानचा धक्कादायक प्रकार