मंगेश काळोखे प्रकरणात संपूर्ण देवकर कुटुंबासह पाच साथीदार जेरबंद 
महाराष्ट्र

मंगेश काळोखे प्रकरणात संपूर्ण देवकर कुटुंबासह पाच साथीदार जेरबंद; आरोपींना मदत करणारेही पोलिसांच्या रडारवर

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना असे समोर आले की, मोबाईल फोन बंद करून काही आरोपी कोकणाच्या दिशेने, काही मुंबई तर काही पुण्याकडे फरार झाले होते.

Swapnil S

धनंजय कवठेकर/ रायगड

खोपोली शहरात मंगेश काळोखे यांच्यासोबत घडलेल्या अघटित घटनेनंतर सामाजिक व राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी होत असताना, रायगड पोलीस दलाने तातडीने तपासाची सूत्रे हलवली.

पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पोलीस पथकांची स्थापना करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना असे समोर आले की, मोबाईल फोन बंद करून काही आरोपी कोकणाच्या दिशेने, काही मुंबई तर काही पुण्याकडे फरार झाले होते. याचदरम्यान या आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे आणखी काही संशयितही तपासात समोर आले आहेत.

कौशल्यपूर्ण तपास करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. अखेर अवघ्या २४ तासांच्या आत फरार असलेल्या मुख्य आरोपींसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मीला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणात नाव समोर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे अद्याप फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून, लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Weather : हवामान खात्याचा अंदाज; राज्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अजित पवारांच्या अपघातातील सत्य सांगा! राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांची मागणी

मानवी वस्तीत शिरलेले बिबटे नरभक्षक घोषित करणार; वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहिती

Mumbai : विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोणाचे भले? शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांचा सवाल; सहलीचा प्रस्ताव राखून ठेवला