महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही! मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा

दिवाळीपूर्वी मदतीचे तात्पुरते आश्वासन सरकारने दिले होते. मात्र शेतकऱ्यांना मदत दिली गेली नाही. त्यामुळे थरकाप उडेल असे मोठे आंदोलन उभे करु, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Swapnil S

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीपूर्वी मदतीचे तात्पुरते आश्वासन सरकारने दिले होते. मात्र शेतकऱ्यांना मदत दिली गेली नाही. त्यामुळे थरकाप उडेल असे मोठे आंदोलन उभे करु, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यासाठी राज्यभरातील शेतकरी संघटनेचे नेते आणि संघटनांना अंतरवाली सराटीत बोलावणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अंतरवाली सराटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेऊन आंदोलनाविषयी चर्चा करणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत गावात निवडणूक साहित्य किंवा बॅलेट पेपर घेऊन येऊ दिले जाणार नाही, असेही मनोज जरांगेंनी सांगितले. दरम्यान, यावेळी लाडक्या बहिणींना दिलेली मदतही तात्पुरती असून निवडणुकीत लाडक्या बहिणींना फसवणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

मंत्रिमंडळाने काढलेला ‘जीआर’ रद्द करता येत नाही. आम्हाला दिले म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठ्यांची मने जिंकली, प्रमाणपत्र वाटपाची फडणवीसांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

व्यसनमुक्त नवी मुंबईसाठी अत्याधुनिक सुविधा केंद्र; औषधोपचारांसोबत मानसोपचार, समुपदेशन, योग-ध्यानाची सुविधा

Mira-Bhayandar : मराठीला विरोध करत रिक्षाचालकांचे आंदोलन; २५ रिक्षांवर RTO ची कारवाई

VIP दर्शनावरून मंदिरात राडा; आमदाराच्या मुलीने महिला PSI च्या कानशिलात लगावली, प्रत्युत्तरात पोलिसानेही उगारला हात, Video

Navi Mumbai : सोन्याच्या व्यवहाराचे आमिष दाखवून डॉक्टरांना दीड कोटींचा गंडा

Thane : सहा कंत्राटदारांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? महासंघाचा सवाल; ८६ हजार कोटींच्या थकबाकीवरून संताप