देवेंद्र फडणवीस,मनोज जरांगे पाटील (डावीकडून) 
महाराष्ट्र

मराठा आरक्षण जिव्हाळ्याचा प्रश्न! जरांगेंच्या टीकेनंतर फडणवीसांचे प्रत्युत्तर

आम्ही मराठा आरक्षण प्रश्नाबाबत पहिल्या दिवसापासूनच गंभीर आहोत. पहिली गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा प्रश्न नाही.

Swapnil S

नागपूर : आम्ही मराठा आरक्षण प्रश्नाबाबत पहिल्या दिवसापासूनच गंभीर आहोत. पहिली गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा प्रश्न नाही. यावर मजा काय आली पाहिजे? हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

परभणी दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले होते. ते म्हणाले की, “फडणवीस पूर्वी म्हणाले होते की मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. मीसुद्धा मराठ्यांना आरक्षण द्या, असेच म्हणतोय. आतापर्यंत त्यांनी दुसऱ्यावर ढकलले, पण आता ते आरक्षण देतात की नाही, हे समजेल. आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची.”

जरांगेंच्या खोचक प्रतिक्रियेविषयी विचारल्यावर फडणवीस यांनी सांगितले की, “मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये माझ्यासहित एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तीन प्रमुख नेत्यांमध्ये पहिल्या दिवसांपासूनच भूमिकेत कुठलेच अंतर नाही. आमच्यामध्ये कुठलाही अंतर्विरोध नाही. जे काही निर्णय घेतले आहेत, ते तिघांनी मिळून घेतले आहेत. पुढेही जे निर्णय घेऊ, तेसुद्धा तिघेच मिळून घेऊ.”

२५ जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना आता आरपारची लढाई ठरवली आहे. त्यासाठीच मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे हे २५ जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. “मी राहीन अथवा न राहीन, याची पर्वा नाही. पण समाजाला न्याय मिळवून देणार. आतापर्यंत २ कोटीपेक्षा जास्त मराठा बांधवांना आरक्षणाचा फायदा झाला आहे. मराठा आरक्षणाचा, शेतकऱ्यांचा मुद्दा मार्गी लागला की, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाकडे लक्ष देणार,” असे जरांगे म्हणाले.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी