महाराष्ट्र

Maratha Reservation : राज्य सरकारने काढला नवा जीआर ; अर्जून खोतकर म्हणाले, "लढा यशाच्या मार्गाने..."

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सुधारीत जीआर काढण्याची मागणी केली होती.

नवशक्ती Web Desk

मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) काल मनोज जरांगे(Manjoj Jarange) यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकार(Maharashtra Government) यांच्या चर्चा झाली. यानंतर आज राज्य सरकारचे आणि मनोज जरागे याचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी याठिकाणी दाखल झाले आहे. सरकारकडून जरांगे यांना पक्ष देण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांनी सुधारीत जीआर काढण्याची मागणी केली होती. दरम्यान सरकारच्या वतीने माजी आमदार अर्जून खोतकर(Arjun Khotkar) यांनी पक्ष वाचून दाखवला.

यावेळी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, "मी देखील या उपोषणात सहभागी आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही मनोज जरांगे पाटील यांची काळजी घेत आहोत. शासनासमोर हा प्रश्न मांडत आहोत. मुख्यंमंत्र्यांनी देखील ही जबाबदारी मला दिली आहे. रात्री मनोज जरांगेंच्या भूमिकेबाबत बैठक झाली. आम्ही नवीन जीआर काढला. तत्पूर्वी संपूर्ण लढा यशाच्या मार्गाने गेला पाहिजे. अनेक पिढ्या जरांगे यांच्या लढ्याचा इतिहास सांगतील."

मनोज जरांगे यांनी सरसकट आरक्षणाची मागणी केली होती. तसंच वंशावळीचा मुद्दा आणि सरसकट आरक्षणाबाबत मनोज जरांगे आग्रही होते. कालच्या बैठकीत ज्यांच्या नोदी नाहीत. त्यांच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ मागितला आहे. समाजीत लज्ज्ञ लोकांनी समितीला मदत करावी. समिती संभाजीनगरला बसून काम करेल, असं खोतकर म्हणाले. "

FIFA World Cup 2026: आजपासून हल्लागोल! फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या किताबासाठी ४८ संघांत जुगलबंदी

मान्सूनचा प्रवास खोळंबला; पुढील पाच दिवसांत राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस शक्य

'झुरळां'चे २० जूनपासून बेमुदत आंदोलन; प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, आज पुण्यात निदर्शने

अनेक महत्वाची कार्यालये बाँबने उडवण्याची धमकी; मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट

भारताने अमेरिकेकडे नोंदवला निषेध