महाराष्ट्र

Maratha Reservation : राज्य सरकारने काढला नवा जीआर ; अर्जून खोतकर म्हणाले, "लढा यशाच्या मार्गाने..."

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सुधारीत जीआर काढण्याची मागणी केली होती.

नवशक्ती Web Desk

मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) काल मनोज जरांगे(Manjoj Jarange) यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकार(Maharashtra Government) यांच्या चर्चा झाली. यानंतर आज राज्य सरकारचे आणि मनोज जरागे याचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी याठिकाणी दाखल झाले आहे. सरकारकडून जरांगे यांना पक्ष देण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांनी सुधारीत जीआर काढण्याची मागणी केली होती. दरम्यान सरकारच्या वतीने माजी आमदार अर्जून खोतकर(Arjun Khotkar) यांनी पक्ष वाचून दाखवला.

यावेळी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, "मी देखील या उपोषणात सहभागी आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही मनोज जरांगे पाटील यांची काळजी घेत आहोत. शासनासमोर हा प्रश्न मांडत आहोत. मुख्यंमंत्र्यांनी देखील ही जबाबदारी मला दिली आहे. रात्री मनोज जरांगेंच्या भूमिकेबाबत बैठक झाली. आम्ही नवीन जीआर काढला. तत्पूर्वी संपूर्ण लढा यशाच्या मार्गाने गेला पाहिजे. अनेक पिढ्या जरांगे यांच्या लढ्याचा इतिहास सांगतील."

मनोज जरांगे यांनी सरसकट आरक्षणाची मागणी केली होती. तसंच वंशावळीचा मुद्दा आणि सरसकट आरक्षणाबाबत मनोज जरांगे आग्रही होते. कालच्या बैठकीत ज्यांच्या नोदी नाहीत. त्यांच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ मागितला आहे. समाजीत लज्ज्ञ लोकांनी समितीला मदत करावी. समिती संभाजीनगरला बसून काम करेल, असं खोतकर म्हणाले. "

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

कर्जतमध्ये क्रूरतेचा कळस! शेजारणीने केली अडीच वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या, धक्कादायक कारण समोर

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत