महाराष्ट्र

मशाल हे निवडणूक चिन्ह चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच ? काय आहे प्रकरण ?

हे चिन्ह आणि पक्षाचे नाव वापरण्याची मुदत २६ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीनंतर ठाकरे गटाला हे चिन्ह वापरता येणार नाही

प्रतिनिधी

ठाकरे गटात तणाव निर्माण करणारी आणखी एक बातमी आहे. ठाकरे गटातून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून टाकल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. हे चिन्ह आणि पक्षाचे नाव वापरण्याची मुदत २६ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीनंतर ठाकरे गटाला हे चिन्ह वापरता येणार नाही. तसा आदेश निवडणूक आयोगाने जारी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

हे नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस