महाराष्ट्र

कोल्हापुरकरांच्या मदतीला मुंबईची धाव; परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी BMC चा खारीचा वाटा!

कोल्हापूर येथे मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर त्याठिकाणी जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

Swapnil S

मुंबई : कोल्हापूर येथे मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर त्याठिकाणी जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे.

पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे स्वच्छतेसाठी कोल्हापुरात दाखल झालेल्या चमूमार्फत स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. याठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी मुंबई महापालिकेनेही खारीचा वाटा उचलला आहे.

कोल्हापूर येथे पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. कोल्हापूर शहरातील स्वच्छतेसाठी दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर यंत्रे मदतीसाठी देण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली होती.

महाराष्ट्राला केंद्र सरकारची 'व्हॅलेंटाईन' भेट; कसारा-मनमाड तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाइन प्रकल्पाला केंद्राची मंजुरी

'टिपू सुलतान'वरून वादाचा धुरळा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून माफीची मागणी

आजचे राशिभविष्य, १५ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीला 'या' वेळेतच करा जलाभिषेक! रात्रीचे चार प्रहर, पूजेची योग्य वेळ आणि संपूर्ण विधी, जाणून घ्या

Mahashivratri 2026 : हर हर महादेव! महाशिवरात्रीनिमित्त शेअर करा खास मराठी शुभेच्छा