संदीपान भुमरे यांचे संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

दीड महिन्यानंतर भुमरे यांच्या राजीनाम्याची अधिसूचना; भुमरेंची खाती मंत्री दादा भुसेंकडे

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर १४ दिवसांत दोन पदांपैकी एका पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे संदीपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला. भुमरे यांचा राजीनामा राज्यपालांनीही स्वीकारला. मात्र..

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर १४ दिवसांत दोन पदांपैकी एका पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे संदीपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला. भुमरे यांचा राजीनामा राज्यपालांनीही स्वीकारला. मात्र तब्बल दीड महिन्यानंतर भुमरे यांच्या राजीनाम्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, भुमरे यांची मंत्रिपदाची सूत्रे दादा भुसेंकडे सोपवण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भुमरे यांनी छत्रपती संभाजी नगर मतदार संघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत भुमरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे व एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा पराभव करत थेट दिल्ली गाठली. निवडणूक जिंकल्यानंतर विजयी उमेदवाराला एका पदावरच राहता येते. त्यामुळे भुमरे यांनी राज्यातील मंत्री पदाचा राजीनामा देणे पसंत केले. २७ जून रोजी भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. राज्यपालांनी तो तत्काळ स्विकरला. भुमरे यांच्याकडील दोन्ही खाती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु भुमरे यांच्या राजीनाम्याची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने ७ ऑगस्ट रोजी जारी केली आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी