महाराष्ट्र

पनवेल-अलिबाग ST सेवा ठप्प; प्रवाशांची रात्री गैरसोय

पनवेलहून अलिबाग, रेवदंडा, मुरुड आणि वडखळ या भागात जाणाऱ्या प्रवाशांना रात्री ८ ते ८.३० नंतर एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Swapnil S

अलिबाग : पनवेलहून अलिबाग, रेवदंडा, मुरुड आणि वडखळ या भागात जाणाऱ्या प्रवाशांना रात्री ८ ते ८.३० नंतर एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वेळेनंतर नियमित बस सेवा थांबत असल्याने प्रवाशांना इतर अनियमित गाड्यांवर अवलंबून राहावे लागते.

सामाजिक कार्यकर्ते देवव्रत विष्णू पाटील यांनी सांगितले की, ‘स्थानिक लोकप्रतिनिधी एसटीने प्रवास करत नसल्याने त्यांना नागरिकांच्या अडचणींची जाणीवच होत नाही.’

वडखळ गावातही एसटी सेवेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. रात्री ९ नंतर पनवेलहून वडखळकडे जाण्यासाठी अलिबाग मार्गाव्यतिरिक्त इतर बस थांबत नसल्याची तक्रार प्रवासी राजेश म्हात्रे यांनी केली आहे.

या प्रश्नावर खासदार, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्यांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. “निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जाब विचारावा,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. खासगी वाहनचालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारून त्यांची लूट करत आहेत. काही नागरिकांनी एसटी अधिकाऱ्यांसोबत संगनमत असल्याचाही आरोप केला आहे.

डेपोमधील संपर्क क्रमांक कायम व्यस्त किंवा बंद असतात आणि अधिकाऱ्यांचे वर्तन उद्धट असल्याच्या तक्रारी येत आहेत.

प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या; तातडीच्या उपाययोजनांची गरज

शासनाकडून चांगल्या सेवांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात एसटी सेवा कोलमडलेली दिसत आहे. चालक व कंडक्टरांची कमतरता, जुन्या बस आणि विस्कळीत वेळापत्रक यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. रात्रीच्या अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करणे, वडखळ येथे बस थांबे वाढवणे आणि डेपोमधील गैरप्रकारांची चौकशी करणे, या मागण्या आता जोर धरत आहेत.

घारापुरी बेटावर प्रगत जलव्यवस्थापनाचा उलगडा; पुरातत्त्व विभागाचे उत्खनन, जागतिक व्यापाराचे केंद्र असल्याचेही समोर

लाचखोर ठेका अभियंत्याची बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नियुक्ती; स्वराज अभियानचा आक्षेप, सेवेतूनच कमी करण्याची मागणी!

रत्नागिरी पॅसेंजर दादरहून नाहीच; पाचव्या-सहाव्या मार्गिकेनंतर दादरपासून गाडी चालविण्याचा विचार

२५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जिल्हास्तरावरील प्रशासनात एकाचवेळी मोठे फेरबदल

नवी मुंबईत उभारणार १ लाख प्रेक्षक क्षमतेचे नवे क्रिकेट स्टेडियम