महाराष्ट्र

पटोलेंनी इतिहासाबद्दल माहिती घेऊन बोलावे; भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा टोला

काँग्रेस-मुस्लिम लीगला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी डॉ. मुखर्जी यांनी कृषक प्रजा पार्टी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकशी आघाडी केली होती, हा इतिहास आहे. इतिहासातील घटनांबद्दल बोलताना नाना पटोले यांनी पूर्ण माहिती घेऊनच बोलावे, असा टोला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी लगावला.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाल प्रांताच्या सरकार स्थापनेवेळी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीगशी नव्हे तर फजलूल हक कृषक प्रजा पार्टीशी आघाडी केली होती. काँग्रेस-मुस्लिम लीगला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी डॉ. मुखर्जी यांनी कृषक प्रजा पार्टी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकशी आघाडी केली होती, हा इतिहास आहे. इतिहासातील घटनांबद्दल बोलताना नाना पटोले यांनी पूर्ण माहिती घेऊनच बोलावे, असा टोला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी लगावला.

“पटोले ज्या बंगाल मंत्रिमंडळाबद्दल बोलले आहेत, ते सरकार मुस्लिम लीगचे नव्हते. त्या सरकारचे मुख्यमंत्री होते, कृषक प्रजा पार्टीचे फजलूल हक. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांना सरकार बनविण्यापासून रोखण्यासाठी डॉ. मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फॉरवर्ड ब्लॉक आणि फजलूल हक यांचा कृषक प्रजा पार्टी हे तीन पक्ष एकत्र आले होते,” अशी माहिती भांडारी यांनी दिली आहे.

जम्मूमध्ये Kashmir Times च्या ऑफिसवर SIA चा छापा; एके ४७ रायफल्सची काडतुसे, पिस्तूल राउंड्स, हँड ग्रेनेड पिन्स जप्त

भाजपची बिनविरोधी रणनीती; जळगावमध्ये नगराध्यक्षपदी गिरीश महाजनांच्या पत्नीचा विजय, शिंदे गटाला धक्का

पिकनिक ठरली शेवटची! ताम्हिणी घाटात भीषण अपघात; नवी कोरी थार कोसळली दरीत, ६ तरुणांचा मृत्यू

थोडा आगे हो! लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने वाद; चार-पाच जणांनी केली मारहाण, कल्याणच्या मराठी विद्यार्थ्याने संपवलं जीवन

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राज्यपाल-राष्ट्रपतींना वेळमर्यादा नाही, 'तो' निर्णय ठरवला असंवैधानिक