महाराष्ट्र

युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांचा लाठीचार्ज; रोहित पवार भडकले

सरकारकडून निवेदन स्वीकारायला कोणीही आलं नाही. त्यामुळे रोहित पवार हे आक्रमक झाल्याचं दिसून आले.

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपूर येथे समारोप झाला. नागपूरच्या टेकडी परिसरात या यात्रेची समारोप सभा आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीतील सर्व बड्या नेत्यांनी या समारोप सभेला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. या सभेनंतर तरुणांचा विराट असा मोर्चा रोहित पवार यांनी थेट विधान भवनावर नेला. यावेळी पोलिसांकडून रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा अडवण्यात आली. यानंतर मात्र या यात्रेतील तरुण आक्रमक झाले. समारोप सभेनंतर रोहित पवार यांनी युवकांसमवेत विधानभवनावर धडक दिल्याने पोलिसांनी त्यांना मध्येचं अडवलं.

रोहित पवार यांच्या नेतृत्वातील ही यात्रा हजारो तरुणांना घेऊन विधान भवनावर धडकल्याने पोलिसांनी यात्रा अडवली. यावेळी पोलिसांनी रोहित पवार यांना ताब्यात घेतलं. मात्र, रोहित यांनी यावेळी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने त्यांना पोलिसांनी खासगी वाहनातून नेलं. रोहित पवार यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारकडून निवेदन स्वीकारायला कोणीही आलं नाही. त्यामुळे रोहित पवार हे आक्रमक झाल्याचं दिसून आले.

रोहित पवार संतापले-

गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास ८०० किमीचा प्रवास करुन महाराष्ट्रातल्या युवकांचे प्रश्न, आरोग्य, शेती अशा अनेक प्रश्नांना घेवून घेऊन ही यात्रा नागपूर येथील विधान भवनात पोहोचली होती. नागपूर येथेच या यात्रेचा समारोप करण्यात आला होता. मात्र, सरकारने पोलीस बळाचा वापर करत या यात्रेला मध्येच अडवल्याने रोहित पवार आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या गरिबांच्या पोरांवर लाठीचार्ज करत आहात. ही कसली दडपशाही आहे? सरकारला चर्चा करायला काय होतं. आमदारांची हो परिस्थिती आहे, तर गरीब लोकांची काय परिस्थिती असेल? अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवार यांनी यावेळी दिली.

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन, २० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण

Mumbai : मध्य रेल्वेकडून दरवाढीचा प्रस्ताव रद्द; रेल्वे स्टॉलवरील वडा पाव-समोसा जुन्याच किंमतीत मिळणार

Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला