महाराष्ट्र

साखर निर्यात बंदीची शक्यता

साखर कारखान्यांच्या संघटनेची माहिती

नवशक्ती Web Desk

औरंगाबाद : यंदा समाधानकारक पाऊस न पडल्याने महाराष्ट्र व कर्नाटकात साखरेचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे साखरेची निर्यात बंदी होऊ शकते, असा अंदाज साखर कारखान्यांच्या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, देशांतर्गत साखरेची मागणी पूर्ण होण्यासाठी साखर निर्यातीवर बंदी शक्य आहे. देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादनाचा अंदाज आहे, मात्र त्यात घट होऊ शकते. सध्या देशात ६५ लाख टन साखरेचा साठा आहे, तर देशाची साखरेची मागणी २७५ लाख टन आहे, तर ५० लाख टन साखर ही इथेनॉल उत्पादनासाठी वळवली जाते, असे त्यांनी सांगितले.

देशातील २७५ लाख टन साखरेची मागणी पूर्ण करायला निर्यातीचे हत्यार उपसले जाऊ शकते. भारत हा कायम साखर निर्यात करत नाही. गेल्या दोन वर्षांत साखरेची जगात टंचाई होती. तेव्हा भारताने ६० लाख टन साखर निर्यात केली. यंदा इथेनॉल निर्मितीचे लक्ष्यही हुकण्याची चिन्हे दिसत आहेत, असे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली