महाराष्ट्र

पुण्यातील पब, बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहणार

हॉटेल आणि पबमालकांनी नियमांचे पालन केल्यास पोलीस कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाहीत, असे आश्वासन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार मालकांना बैठकीनंतर दिले आहे. मात्र...

Swapnil S

पुणे : पुण्यातील पब, बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि पबमालकांनी नियमांचे पालन केल्यास पोलीस कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाहीत, असे आश्वासन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार मालकांना बैठकीनंतर दिले आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला पुण्यात बंदी असेल.

महानगरांची नाईट लाईफ ज्यांच्यावर अवलंबून असते ते पब, बार आणि रेस्टॉरंट एकाचवेळी सरकारसाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत असतात तर दुसरीकडे गैरप्रकार रोखण्यासाठी या पब आणि बारवर पोलिसांनी बारीक नजर ठेवणे आवश्यक असते. अनेकदा पब आणि बारमालकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा करत पोलिसांकडून कारवाई करण्यात येते तर पोलीस जाणीवपूर्वक त्रास देत असल्यानं व्यावसायावर परिणाम होत असल्याची पब आणि बार मालकांची तक्रार असते. यावर उपाय शोधण्यासाठी पुण्यातील पब, बार आणि हॉटेल व्यावसायिकांची पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील पब, बार आणि सर्व प्रकारची हॉटेल्स पूर्वीप्रमाणे दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास इथून पुढे देखील परवानगी असणार आहे.

पोलीस आयुक्त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकदा स्थानिक पोलिसांकडून होण्याऱ्या विनाकारण त्रासाला आळा बसेल, असे पबमालकांना वाटत आहे. मात्र रात्री दीड वाजेपर्यंत पब आणि रेस्टाॅरंट सुरू ठेवताना पब आणि रेस्टॉरंटमालकांना नियमांचे पालनही करावे लागेल.

राज्यात आजपासून नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांना ब्रेक; वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

Thane Heatwave Alert : ठाणे जिल्ह्यात वाढणार उन्हाचा तडाखा; हवामान खात्याचा इशारा, वाचा महत्त्वाच्या सूचना

GMLR प्रकल्पातील बाधितांसाठी आनंदाची बातमी! महिनाअखेरीस कांजूरमार्ग येथे मिळणार नवी घरे

पुण्यातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीला इराण-इस्रायल युद्धाचा फटका! गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद, महापालिकेचा निर्णय

म्हाडा मुंबईची २५०० घरांची सोडत महिनाअखेरीस; पत्राचाळीतील घरे यंदाच्या लॉटरीतून वगळणार; एप्रिल महिन्यात प्राप्त अर्जांची लॉटरी