महाराष्ट्र

‘त्या’ विद्यार्थिनीची अखेर तुरुंगातून सुटका

भारत-पाकिस्तान संघर्षावरील सोशल मीडिया पोस्टमुळे अटकेत असलेल्या पुण्यातील १९ वर्षीय विद्यार्थिनीची पुणे येथील येरवडा जेलमधून बुधवारी सुटका झाली.

Swapnil S

मुंबई : भारत-पाकिस्तान संघर्षावरील सोशल मीडिया पोस्टमुळे अटकेत असलेल्या पुण्यातील १९ वर्षीय विद्यार्थिनीची पुणे येथील येरवडा जेलमधून बुधवारी सुटका झाली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी रात्री तिची सुटका करण्यात आली. न्यायालयाने तिच्या शिक्षणसंस्थेला देखील झापले असून, सिंगड अॅलकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगने दिलेला तिच्या कॉलेजमधून काढून टाकण्याचा (रस्टिकेशन) आदेशही न्यायालयाने तात्पुरता स्थगित केलेला आहे.

विद्यार्थिनी जम्मू-काश्मीरची असून, २०२३ मध्ये सिंगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या माहिती तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पुण्यात आली होती. ७ मे रोजी तिने 'रिफॉर्मिस्तान' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून भारत सरकारच्या धोरणांवर टीका करणारी पोस्ट शेअर केली होती.

गुन्हा काय?

९ मे रोजी पुण्याच्या कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर अटक झाली. ती येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होती. त्यानंतर वकील फरहाना शहा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी तिच्या रस्टिकेशनचा आदेश रद्द करण्याची मागणी केली. जामीन आणि गुन्हा रद्द करण्याचीही विनंती केली होती.

सुटका कशी?

मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणातील सरकारी प्रतिसाद धक्कादायक आणि अतिरेकी होता. उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर करत तिचे "तिला कट्टर गुन्हेगार" बनवल्याबद्दल महाराष्ट्र सरकारला फटकारले होते. न्यायालयाने विद्यार्थिनीला तात्काळ मुक्त करण्याचा आदेश दिला.

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी