महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? कोर्लईच्या माजी सरपंचांना अटक

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोर्लईतील १९ बंगल्याच्या घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंविरुद्ध केले होते गंभीर आरोप

प्रतिनिधी

ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, भप नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीतील कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी सरपंचांना अटक केली आहे. रेवदंडा पोलिसांनी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. २४ फेब्रुवारीला तत्कालिन ​​​​​​सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामसेवक अशा ६ जणांवर गुन्हा दाखल केला होता.

सोमवारी रात्री रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील १९ बंगल्यांचे खोटे कागदपत्र बनवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी माजी सरपंचांना अटक केली. मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्या ६ जणांवर भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये ​​​​​​​गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक