महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? कोर्लईच्या माजी सरपंचांना अटक

प्रतिनिधी

ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, भप नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीतील कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी सरपंचांना अटक केली आहे. रेवदंडा पोलिसांनी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. २४ फेब्रुवारीला तत्कालिन ​​​​​​सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामसेवक अशा ६ जणांवर गुन्हा दाखल केला होता.

सोमवारी रात्री रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील १९ बंगल्यांचे खोटे कागदपत्र बनवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी माजी सरपंचांना अटक केली. मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्या ६ जणांवर भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये ​​​​​​​गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस