मोहन भागवत  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

संघासारखी संघटना नागपूर शहरातच राहू शकते; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

'त्यागभावना आणि सामाजिक बांधिलकीच्या आत्म्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना नागपुरातच उभी राहू शकली, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

Swapnil S

नागपूर : 'त्यागभावना आणि सामाजिक बांधिलकीच्या आत्म्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना नागपुरातच उभी राहू शकली, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेतील आणि वाढीतील अनोख्या योगदानावर भर दिला. नागपूर महाराज ट्रस्ट आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, "देशभरात हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारे आणि हिंदू ऐक्याची हाक देणारे लोक होते, तरीदेखील मला वाटते की संघासारखी संघटना फक्त नागपुरातच उभी राहू शकली असती. इथल्या लोकांमध्ये आधीपासूनच त्याग आणि समाजसेवेची भावना होती, ज्यामुळे डॉ. हेडगेवारांना संघ स्थापन करणे शक्य झाले.'

अलीकडेच संघाने विजयादशमीच्या दिवशी आपला शताब्दी उत्सव साजरा केला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये नागपुरात स्थापन केलेला हा स्वयंसेवक आधारित संघ आहे, ज्याचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये सांस्कृतिक जागरूकता, शिस्त, सेवा आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हे आहे.

भागवत म्हणाले,' देश घडवणे आणि त्याचा विकास करणे ही आपली जबाबदारी आहे. असे केल्याने आपण स्वतःचे हित जपतो. जो देश प्रगती करतो, तोच जगात सुरक्षित आणि आदरास पात्र ठरतो. संघप्रमुखांनी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचा उल्लेख करत त्यांना "स्वराज्य आणि ऐक्याचे द्रष्टे" असे संबोधले. ते म्हणाले, "शिवाजी महाराजांचे प्रयत्न वैयक्तिक फायद्यासाठी नव्हते, तर ते देव, धर्म आणि राष्ट्रासाठी होते.

महानगरामध्ये आणखी परवडणारी घरे; उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

विधिमंडळातील आश्वासने ९० दिवसांत होणार पूर्ण; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा विश्वास

नवाजुद्दीन सिद्दीकीला न्यायालयाचा झटका; भावाविरोधातील मानहानीचा खटला फेटाळला

जमीन मोजणीचा निपटारा आता 30 दिवसांत! प्रकरणे मार्गी लागणार; खासगी भूमापकाची मोजणी सरकारी अधिकारी करणार

सरकारकडून शेती कर्जवसुलीला स्थगिती