महाराष्ट्र

कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस-राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला मनसेप्रमुख राज ठाकरे घाबरले म्हणून ते आले नाहीत, असा टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. त्यावर उबाठा नेते संजय राऊत यांनी पलटवार केला.

Swapnil S

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला मनसेप्रमुख राज ठाकरे घाबरले म्हणून ते आले नाहीत, असा टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. त्यावर उबाठा नेते संजय राऊत यांनी पलटवार केला. ते म्हणाले, त्याला नीट धोतर नेसता येत नाही, तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय. कोश्यारी हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करणारा हा माणूस आहे. त्याला भाजपने पद्मभूषण दिले. त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी जोड्याने मारले असते, अशी टीका त्यांनी केली.

...तर त्यांनी कोश्यारींना खूप चोपला असता

भगत सिंह आज जर असते तर त्या कोश्यारीला खूप चोपला असता. त्या कोश्यारीने पहिले नाव बदलावे, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कोश्यारी यांच्यावर टीका केली. दरम्यान, चंद्रपूर पालिकेसंदर्भात मला मिळालेली माहिती आहे कि, उबाठा गटाच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आले आहेत, असा दावा देशपांडेंनी केला. याबाबत राऊतांना अंधारात ठेवले की, त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधली, हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले.

ZIM vs AUS: झिम्बाब्वेकडून कांगारूंची 'शिकार'! टी-२० विश्वचषकात सर्वात मोठी उलथापालथ; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

रिकव्हरी एजंट्सना RBI चा दणका! कर्जवसुलीच्या दादागिरीला लगाम; १ जुलैपासून लागू होणार नवे नियम; वाचा सविस्तर

Mumbai : मानखुर्दमधील धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलाचे अपहरण करून वारंवार लैंगिक अत्याचार, १९ वर्षांच्या तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा

आम्ही आक्षेप घेतला म्हणून भारताचा ‘तो’ नकाशा अमेरिकेने हटवला...; पाकिस्तानचा दावा

BNP च्या विजयामुळे भारत-बांगलादेश संबंधांना नवी दिशा? PM मोदींनी तारीक रहमान यांचे "निर्णायक विजयाबद्दल" केले अभिनंदन